Aacharya Academy 11 +12 + NDA batches of 2024 start from 1st June, 24 and 1st July,24. Now Aacharya Academy does have its own campus including hostel, college mess and ground so hurry and enroll soon. Attention: Aacharya Academy does not have any other branch except Tilak Road and Manikbaug, beware of fake academy using our name.

About Aacharya Academy

01

Aacharya Academy is situated in the heart of Pune city which has great heritage of education. Academy is surrounded by many reputed colleges , hostels and mess. This results in availability of excellent educational facilities and faculties. We are associated with such reputed college. The college has variety of subjects of students interest and choice such as vocational subjects Electrical maintenance, Mechanical Maintenance, Computer Science, Information technology and foreign languages.

Aacharya Academy started in 2000 and has completed successfully so many years of quality educational training. Our staff has increased from two faculties to 19 faculties and seven nonteaching staff. All the faculties are post graduate or doctorate in their concern subjects and have more than 20 years of teaching experience and experience of teaching for exams like NDA , CDSE , AFCAT etc. Every year we have achieved different goals and developed our groups and activities . We have the activities for development of student's logical, scientific and social aptitude. We also conduct the programmes to develop the personality of students.

Aacharya Academy has achieved good results in NDA exam, Naval academy exam , CDS , AFCAT exam. Every year we are adding good results in our credit. We request you to visit our gallery of successful students.

Read More

Congratulations



Blog

03
29 Mar 2024

NDA ची प्रवेश परिक्षा आणि इंग्रजीची आवश्यकता.

NDA म्हणजेच National Defence Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी) येथे प्रशिक्षण पुर्ण करुन विद्यार्थी सैन्य दलात अधिकारी म्हणून रुजु होतो.NDA च्या परिक्षेचे चार प्रमुख टप्पे येतात लेखी परिक्षा, मुलाखत (SSB) वैद्यकीय चाचणी, गुणत्ता यादी. या परिक्षांमध्ये इंग्रजीचे महत्त्व खुपच जास्त आहे. दोन्ही परिक्षा लेखी मुलाखत या संपुर्ण इंग्रजीतून होतात. मुलाखतीच्या वेळेस इंग्रजीतून बोलणे म्हणजे आपल्यात धाडस नाही असा अर्थ लावला जाऊ शकतो. (अर्थात यासाठी अन्य काही निकषही असतात) लेखी परिक्षेमध्ये व्याकरणावर अधारीत 200 मार्कांचे प्रश्न विचारतात तर मुलाखत ही पाच दिवसांची असते ज्यात सर्व कामकाज इंग्रजीतूनच चालते TAT,WAT,SRT,GP, अश्या विविध टेस्ट इंग्रजीतूनच लिहायच्या असतात तर G.D, Lecturate, Interview अश्या परिक्षांमध्ये इंग्रजीतून बोलायचे असते. थोडक्यात इंग्रजी हा या परिक्षांचा अविभाज्य भाग आहे.

इंग्रजीचा अभ्यास चांगला करण्यासाठी पुढील गोष्टी करणे गरजेचे आहे

1.  व्याकरणाचा अभ्यास

2.  शब्दसंग्रह वाढविणे

3. इंग्रजीतून पुढील क्रिया करणे

a) बोलणे b)लिहीणे c)वाचणे d)ऐकणे e)विचार करणे.

व्याकरण हाच वाक्याचा पाया असतो. शब्दांची योग्य जुळणी करुन वाक्य तयार होते संवाद साधता येतो. लेखी परिक्षेत सर्व प्रश्न व्याकरण शब्दसंग्रह यावर आधारीत असतात . योग्य तज्ञाकडून व्याकरण शिकावे तसेच परिक्षेतिल प्रश्न  प्रकार ते सोडवण्यांची पध्द्त माहित करुन घ्यावी. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी इंग्रजी वृत्तपत्र रोज मोठ्यांदा वाचावे यातून बोलण्याचा सराव होईल,योग्य पध्द्तीने वाचन करण्याचा सराव होईल, इंग्रजीची आकलन क्षमता वाढेल, चालु घडामोडी (current affairs), सामान्यज्ञान (G.K) याचीही तयारी होईल. या वाचनाचा लेखी परिक्षेसाठीही खुप फायदा होतो. महत्त्वाच्या मुद्यांची नोंद करावी यातून G.D.,Lecturate ची तयारी होईल.


आपल्यासारख्या ध्येयवादी मित्रांचा गट करावा व त्यांच्या बरोबर इंग्रजीतून संभाषण करावे. आपल्या चुका योग्य व्यक्तीकडून दूरुस्त करुन घ्याव्यात. टि.व्ही वरील गट चर्चा, बातम्या इंग्रजीतून ऐकव्यात. समोरच्याची प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी उचलू नये ती आपल्या व्यक्तीमत्त्वास साजेशी आपल्या विचारास पटेल अशी मांडावी तेही आपल्या शब्दात यामुळे तूम्ही स्वत:चे विचार मांडत आहात अशी परिक्षकाची खात्री होईल.


स्पर्धा परिक्षांमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे थोडे फिरवून हुशारीने विचारलेले असतात. प्रश्न विचारले असतात एका नियमावर पण कौशल्यपुर्ण शब्दानकंण आठवण भलत्याच नियमांची करुन देतात. एका पेक्षा जास्त संज्ञाचा (concepts चा) गुंता केलेला असु शकतो. उदा. ‘No Sooner’ नंतर ‘than’ येते. परंतु वाक्यात ‘than’ ऐवजी ‘then’ वापरतात त्याच्या आधीच्या वाक्यात वेळेशी संबंधीत वाक्यरचना करतात त्यामुळे ‘then’चा वापर योग्य वाटतो परिक्षेच्या घाईगर्दीत ही चुक लक्षात येत नाही. यासाठी प्रश्न सोडवण्याची पध्द्त व्यवस्थीत तयार करावी लागते जेणे करुन ह्या चुका होणार नाहीत. रोजच्या व्यवहारात आपण काही गोष्टी संदर्भातून समजून घेतो त्यामुळे आपण व्याकरण दृष्ट्या पुर्ण वाक्ये करत नाही. याच गोष्टीचा फायदा घेत परिक्षेत फिरक्या घेतल्या जातात. या सापळ्यात फसायचे नसेल तर अश्या प्रश्नांचा सतत सराव करणे गरजेचे आहे. हे प्रश्न नेहमीच्या प्रश्नांपेक्षा थोडे वेगळे असतात. येथे पर्याय दिलेले असल्याने  प्रश्नात पुर्ण माहीती स्पष्ट करतातच असे नाही. प्रश्न वाचण्याच्या सोडवण्याच्या सरावाने या गोंष्टींवर मात करता येतेप्रश्नांची भाषा त्यातील फिरक्या घेण्याची पध्द्त ही सरावाने आत्मसात होते. थोडक्यात NDA परिक्षेत यश मिळवण्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे हे प्रभुत्व NDA च्या परिक्षा पध्द्तीनुसार (as per pattern) असावे.

परिक्षेत यशस्वी होण्यासाठी नेमका अभ्यासक्रम पुर्ण करावा अभ्यासक्रम खुप जास्त असल्याने त्याचे योग्य नियोजन करावे सराव ठेवावा शुभेच्छा !!!

29 Mar 2024

एक उत्तम पर्याय म्हणजेच NDA नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी किंवा राष्ट्रीय रक्षा अकादमी.

लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी अनेक पर्यांयांपैकी एक उत्तम पर्याय म्हणजेच NDA नॅशनल डिफेन्स कॅडेमी किंवा राष्ट्री रक्षा अकादमी केंद्र सरकारद्वारा संचालित या संस्थेत भारतीय लष्करी अधिकारी घडवले जातात. या संस्थेची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे करण्यात आली आहेयेथे शारिरीक, मानसिक तसेच शैक्षणिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठाची BSC,BA किंवा BCom ची डिग्री विद्यार्थ्यांना प्राप्त होते. तीन वर्षांचा असा एकूण येथील प्रशिक्षण कालावधी आहे.

पुर्वतयारी:

सर्व साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यास तो बारावीत असतानाच्या ऑगस्ट मध्ये प्रथम परीक्षेची संधी मिळते यात तो यशस्वी झाल्यास NDAत दाखल होऊ शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांस ११वी १२वी चा अभ्यास  १२वीत जाण्यापुर्वी संपवावा लागतो. या साठी १० वीच्या परीक्षेनंतरच जर त्याने तयारी सुरु केली तर त्यास यात यश मिळवणे सोपे जाते.

गणित, इंग्रजी हे NDAच्या परिक्षेचे महत्ताचे विषय असल्याने या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी १०वी नंतरच्या मोठ्या सुट्टीचा वापर करावा. त्याच बरोबरच इतिहास, भूगोल या विषयांचे वाचन व अभ्यास करावा. याचा परिक्षे बरोबरच व्यत्त्किमत्व विकासासाठी त्यास उपयोग होईल व सुट्टीही मजेत जाईल तसेच या सुट्टीत एखादी परकीय भाषा शिकल्यास व व्यायामाची सवय जोपासल्यास त्याचा फायदा मिळेल.

 ११ वी प्रवेशाची तयारी:

११ वीत प्रवेश घेताना दोन मुद्यांचा विचार करावा 

1) NDAपरीक्षा पास होण्यासाठी विषय निवडणे

2) NDAपरीक्षा पास न झाल्यास जो कोर्स निवडायचा असेल त्यानुसार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एयर फोर्स किंवा नेव्ही ऑप्शन्स्    निवडायचे आहेत. त्यांना शास्त्र शाखा अनिवार्य आहे. कला आणि वाणिज्य शाखा निवडल्यास आर्मी हा एकमेव पर्याय शिल्लक राहील.

शास्त्र शाखा निवडल्यास गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र हे विषय असलेच पाहिजेत. उरलेल्या विषयांसाठी जीवशास्त्र किंवा भुगोल व एक परकीय भाषा असे विषय निवडावेत. कला शाखा निवडल्यास गणित, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र,इंग्रजी, एक परकीय भाषा व अन्य आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडावेत. वाणिज्य शाखा निवडल्यास गणित, इंग्रजी, इकॉनॉमिक्स्, अकांऊटस् व आपल्या आवडीप्रमाणे अन्य विषय निवडावेत. श्स पद्धतीने विषय निवडल्यास लेखी  परीक्षेची तयारी व ११वी १२वी ची तयारी समान राहिल्याने आपणास NDA व ११वी १२वी साठी वेगळा वेगळा अभ्यास करावा लागणार नाही. त्यामूळे वेळही वाचेल व यश मिळवणे सोपे जाईल. शक्यतो वाणिज्य शाखा निवडू नये.

योग्य प्रवेश झाल्यानंतर आता तयारी लेखी परीक्षेची :

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ११ वी १२वी चा अभ्यासक्रम १२वी च्या ऑगस्टपुर्वी संपवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा पुढीलप्रमाणे असते.

) लेखी परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला-गणित 300 मार्कांचा-साधारणत: 11वी 12वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित,दुसरा पेपर -सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल ॲबिलीटी टेस्ट 600 मार्कांचा- या पेपरचे एकूण तीन भाग पडतात पहिला भाग - इंग्रजी 200 मार्क,दुसरा भाग - शास्त्र 200 मार्कस्, तीसरा भाग - इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान व चालू घटना एकूण 200 मार्कस् प्रत्येक पेपर अडीच तासांचा असतो. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. चुकीच्या उत्तरास निगेटीव्ह मार्किंग प्रमाणे गुण कमी केले जातात. गणिताच्या पेपरमध्ये 120 प्रश्न असतात. तर दुसऱ्या पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. त्यामूळे कमी वेळामध्ये अधिका अधिक प्रश्न सोडवण्याचा सराव करावा लागतो. लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम सर्व अभ्यासक्रमाची थेअरी उत्तम करावी व त्यानंतर कमी वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी सराव करावा. प्रश्न सोडविण्याच्या युक्त्या तयार कराव्यात.

लेखी परिक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. पहिला पेपर गणिताचा 10 ते 12.30 व दूसरा पेपर 2 ते 4.30 या वेळात असतो. महाराष्ट्रात ही परिक्षा मुंबई व नागपूर येथील केंद्रांवर देता येते.

परिक्षेचे फॉर्मस् प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोस्ट ऑफीसमध्ये मिळतात. सर्व प्रमुख वर्तमान पत्रात जाहिरात येते. एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचार पत्रात सविस्तर जाहिरात येते. जाहिरात आल्यापासून 1 महिन्याच्या मुदतीत फॉर्म भरुन पाठवावा लागतो. या सगळ्याचे वेळापत्रक www.upsc.gov.in या वेबसाईटवरती पहायला मिळेल.

लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पत्राद्वारे कळविण्यात येते तसेच मुलाखतीची  तारीख वेळ कळविली जाते. सर्वसाधारणपणे तीन महिन्यांनी वरील वेबसाईटवर निकाल पहाता येतो. तसेच मुलाखतीची तारीख व माहिती मिळवता येते.

प्रत्यक्ष फॉर्म भरण्यापासून ते अकादमीत दाखल होण्यापर्यंतचा असा एक वर्षाचा कार्यक्रम आहे. त्याचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे

) फॉर्म भरणे (१ महिना)

) ही परिक्षा वर्षातून दोनदा होते त्यामुळे नोव्हेंबर व मार्च अश्या दोन्ही महिन्यात फॉर्म उपलब्ध होतात प्रत्यक्ष वेळापत्रक www.upsc.gov.in या वेबसाईटवर तपासावे.

) लेखी  परिक्षा- फॉर्म भरणे संपल्यानंतर ५ महिन्यांनी एप्रिल व ऑगस्ट अनुक्रमे (तपशील पुढे पहा)

) लेखी परिक्षेचा निकाल 3 महिन्यांनी जाहीर होतो त्यानंतर मुलाखतीसाठी  म्हणून पात्र उमेदवारांस बोलावले जाते. शेवटच्या मुलाखतीनंतर ३ महिन्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते.

) साधारणपणे २७ डिसेंबर किंवा २७ जून अनुक्रमे विद्यार्थ्यी अकादमीत प्रवेश मिळवतात.


मुलाखत परीक्षा :

ही परिक्षा एकूण सात दिवसांची असते. त्याचे दोन भाग असतात. पहिल्या भागास चाळणी परीक्षा असे म्हणतात. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात जातात व अनुर्त्तीण विद्यार्थ्यास परत पाठविले जाते. मुलाखत परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारच्या सायकॉलॉजी टेस्ट तसेच ग्राऊंड टेस्टस् होतात. मुलाखत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास NDA साठी रेक्मेंड केले जाते. अश्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करतात. व त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादी प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परीक्षेच्या कुठल्याही स्टेजला अनुत्तीर्ण झाल्यास परत प्रथम तयारी करावी लागते.


समज गैर समज:

या परीक्षेबाबत अनेक गैर समज आढळून येतात. जसे विद्यार्थ्यांची तब्येत अतिशय धडधाकट असणे तो कराटे चॅम्पियन असणे किंवा त्याचे कुणीतरी सैन्यदलात अधिकारी असणे किंवा सैनिक शाळेत असणे आवश्यक आहे; अशी चुकीची समजूत आहे. प्रत्यक्षात तो विद्यार्थ्यी केवळ प्रशिक्षणास सक्षम असणे व त्याने परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे पुरेसे आहे. NDA त प्रवेशासाठी कोणत्याही राखीव जागा किंवा आरक्षण नाहीत. त्यामूळे अश्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.




29 Mar 2024

NDA ची तयारी करु इच्छिणाऱ्यांसाठी

NDA ची तयारी करु इच्छिणाऱ्यांसाठी:

विद्यार्थी मित्रहो तुम्हाला असे वाटते का की जगातल्या सर्वात उंच शिखरावर चढून हे जग कसे दिसते ते पहावे, -53°C मध्ये जीवन कसे असते ते अनुभवावे, समुद्राच्या तळाशी जीवन कसे असते ते पहावे, घनदाट जंगलात फिरावे, विविध प्रकारच्या संस्कृतींचा अमोल ठेवा असलेला देश फिरावा, ती संस्कृती अनुभवावी आणि हे सगळे करत असताना भारतमातेचे रक्षण करुन आपले कर्तव्यही बजवावे. तर मग तुमच्यासाठी सर्वोतम प्रगतीच्या वाटा म्हणजे भारतीय सशस्त्र सेना दल (Indian Military Forces) काहींच्या दृष्टीने आयुष्यात पैसे कमावणे खुप महत्तवाचे असते.तर काहींच्या दृष्टीने आयुष्य जगणे खुप महत्त्वाचे असते तुम्हाला जर आयुष्य जगायचे असेल तर तुम्ही बिनधास्त भारतीय सेना दलात अधिकारी व्हा कारण येथेच कसे जगायचे हे शिकवले जाते.आज या लेखात 

NDA जाण्यासाठी काय करावे लागते याची माहीती आपण घेणार आहोत.

NDA तील प्रशिक्षण नंतरची सैन्य दलातील सेवा

NDA म्हणजेच National Defense Academy (राष्ट्रीय संरक्षण अकादमी), हे सामान्य कॉलेज नाही सैन्य दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच ते प्रशिक्षण केंद्र आहे. 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी जे NDA च्या परीक्षेत गुणवत्ता यादीत आले आहेत त्यांना गुणवत्तायादी प्रमाणे NDAत प्रवेश दिला जातो. हे विद्यार्थी NDA तील तीन वर्षांच्या प्रशिक्षणा दरम्यान आपला पदवी अभ्यासक्रम (Graduation) शारिरिक प्रशिक्षण, मानसिक प्रशिक्षणआणि सैनिकी प्रशिक्षण (Military training) पुर्ण करतात. हे प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर विद्यार्थी NDA तून Pass out होऊन पुढच्या प्रशिक्षणासाठी पुढच्या अकादमीत जातात . येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पुर्ण केल्यावर विद्यार्थी सैन्य दलात अधिकारी होतो. ही प्रथम दर्जाची (Class one) नियुक्ती असते. शेवटच्या वर्षापासून 25000/- stipend(भत्ता) नंतर अधिकारी झाल्यापासून पुर्ण पगार मिळायला सुरवात होते.

NDA च्या निवड प्रक्रीये संबंधी :-  

NDA च्या निवडप्रक्रियेचे प्रमुख चार टप्पे असतात

  1. लेखी परिक्षा 

  2. मुलाखत (SSB)

  3. वैद्यकीय चाचणी (Medical)

  4. गुणवत्ता यादी.

लेखी परिक्षा 11 वी नंतरच घेतली जाते. यात उत्तीर्ण होणारे विद्यार्थी मुलाखतीसाठी म्हणजेच SSB ला जातात. SSB उतीर्ण होणारे विद्यार्थी वैद्यकीय चाचणीला जातात. यात वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या होतात. सर्व चाचण्या व्यवस्थीत पार पडल्यास विद्यार्थ्यास “Medically fit” असा शेरा दिला जातो. लेखी परिक्षा मुलाखत यांच्या मार्कांच्या आधारावर त्यांची गुणवत्ता यादी तयार होते. गुणवत्ता यादी नुसार त्यांना NDA प्रवेश मिळतो. गुणवत्तायादी बारावीचा रिझल् लागल्यानंतर लागते. निवड प्रक्रियेस एकूण एक वर्षाचा काळ लागतो.

  1. आता आपण लेखी परिक्षेची माहीती घेऊया

लेखी परीक्षा एकूण 900 मार्कांची असते यात गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालु घडामोडी, सामान्यज्ञान, इंग्रजी इत्यादी विषयांचा 8 वी ते 12 वी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो.


लेखी परीक्षा महत्त्वाची आहे कारण 99%  विद्यार्थी या परिक्षेत स्पर्धेतून बाहेर होतात. या परिक्षेच्या तयारीत नुसतचं  गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांचा अभ्यास करुन भागत नाही. कट ऑफ हा प्रत्येक विषयातील मार्कांसाठी असतो. त्यामुळे सर्व विषयांचा अभ्यास करावाच लागतो. यातील प्रश्नही नेहमीच्या प्रश्नांसारखे नसतात. अभ्यासातील नियमीतपणामुळे विषयांचा अभ्यास पुर्ण होऊ शकतो. आपल्या वागण्यातील नियमीतपणा ही एक ऑफीसर्स क्वालिटी आहे. लेखी परिक्षेसाठी रोजचे वर्तमान पत्र वाचन महत्त्वाचे आहे. चालु घडामोडी, सामान्यज्ञान यांच्या तयारी बरोबरच इतरही अनेक गोष्टींची तयारी यातून होते. याची  अधिक माहीती आपण इंग्रजीचे स्पर्धा परिक्षेतील महत्त्व या पुढील लेखात पाहूया. नियमीतपणा, विषयाचे ज्ञान या बरोबरच लेखी परिक्षेत मिलिटरी ॲप्टीटयुड तपासला जातो. आपल्या वागण्यातला नियमीतपणा, आपले निरीक्षण कौशल्य (Observation skills), आपले कार्य कौशल्य (Working skills) इत्यादी गोष्टी या मध्ये येतात.

 या परिक्षेत गणितात 120 प्रश्न 150 मिनटात तर दुसऱ्या पेपरमध्ये 150 प्रश्न 150 मिनिटात सोडवायचे असतात; म्हणजेच एका मिनिटात एक प्रश्न सोडवावा लागतो.

अन्य परिक्षांच्या तुलनेत हा वेळ फारच कमी असतो. JEE/CET अश्या परीक्षांमध्ये गणितात 30 च प्रश्न असतात व वेळ 120 मिनिटांचा असतो तर NDA च्या परिक्षेत हे प्रश्न 120  म्हणजे चौपट असतात व वेळ फक्त 30 मिनिटेच जास्त असतो. अन्य परिक्षांमध्ये फक्त भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचे प्रश्न असतात पण NDA च्या परिक्षेत या व्यतीरिक्त जीवशास्त्र ,भुगोल, इतिहास  अश्या नऊ विषयांवर प्रश्न असतात.

या नऊ विषयातलेच पाच विषय मर्चंन्ट नेव्हीच्या CET मध्ये असतात त्यामुळे  NDAबरोबर या परिक्षेची तयारीही करता येते. ज्याला आपण Plan B असे म्हणू शकतो. Plan B  व त्याच्या नियोजनाची काळजी आपण Plan B  या पुढील लेखात पाहुयात.


लेखी परिक्षेत भरपूर विषय व भरपूर अभ्यासक्रम असतो. लेखी परिक्षा ही 11 वी नंतरच   12 वी च्या परिक्षेच्या आधीच द्यायची  असते. सर्व विषयांचा 8 वी ते 12 वी पर्यंन्तचा अभ्यासक्रम पुर्ण करणे व परिक्षेतील प्रश्न एका मिनिटात सोडवण्याची तयारी करणे यासाठी कमी कालावधी असतो. 11वी व 12 वी चा अभ्यासक्रम एका वर्षातच पुर्ण करावा लागतो. म्हणूनच तो व्यवस्थित पुर्ण करण्यासाठी लवकर सुरुवात करणे गरजेचे आहे. आम्ही साधारणपणे 10 वी नंतर 1 मे पासून तयारी सुरु करतो तेव्हा बारावीच्या सुरुवातीलाच म्हणजे पुढील वर्षाच्या जूनमध्ये अभ्यासक्रम व्यवस्थित पुर्ण होतो. यामुळे NDA तील यशा बरोबर CME आणि NA  च्या परिक्षांसाठीची तयारीही साध्य होते. सैन्य दलात अधिकारी होण्याचे हे अन्य दोन पर्याय आहेत.

लेखी परिक्षा ही अकॅडमीक स्वरुपाची असते. अभ्यासक्रम खुप जास्त असल्याने नियोजन गरजेचे आहे. प्रत्येक प्रकारणाचे भाग पाडून कोणत्या दिवशी आपण कोणता भाग पुर्ण करणार हे जर आपण ठरवले तर लक्षात येईल की पहिल्या दिवसापासूनच नियमीत प्रत्येक दिवसाचा अभ्यास पुर्ण केला तर अभ्यासक्रमाचे क्ष्य (टारगेट) पुर्ण करता येईल.  हे टारगेट पुर्ण करतानाच प्रश्न एका मिनीटात सोडवण्याचे कौशल्य देखील कमावता येईल. जुन्या प्रश्नपत्रिका सोडवायला घ्यायला लागतील कारण आता परिक्षाही समोर येऊन ठेपली असेल.


मुलाखत (SSB ची तयारी)

लेखी परिक्षेनंतरचा पुढचा टप्पा म्हणजेच मुलाखत Interview by Service Selection Board (SSB)ह्या परिक्षेत प्रामुख्याने आपल्या व्यक्तीमत्त्वाची आणि आपल्यातील Officer like Qualities ची तपासणी केली जाते. आपला आचार, विचार आणि वाचा यातील ताळमेळ यात तपासला जातो. विविध सामाजीक प्रश्न (चालु घडामोडी) त्यावरचे आपले विचार व त्या विषयांबदलची  आपली माहीती यात तपासली जाते. ही परिक्षा लेखी परिक्षेनंतर असते पण याची तयारी ही सुरवाती पासूनच करावी लागते व्यक्तीमत्वातील बदल पटकन  होत नाहीत. ग्रुप टेस्टस्, सायकॉलॉजीकल टेस्टस, इंन्टरव्हयु अशा विविध प्रकारच्या परिक्षा यात होतात. ही परिक्षा संपुर्ण इंग्रजीतून होते. इंग्रजीतून बोलणे, लिहीणे, वाचणे, ऐकणे या सर्व कौशल्यांची गरज असतें. याची सखोल माहीती पुढील लेखात पहाणार आहोतच. SSB परिक्षा म्हणजे केवळ मैदानी परिक्षा नव्हे. जवान भरतीसारख्या मैदानी चाचण्या यात होत नाहीत. आपल्यातले नेतृत्त्व गुण तपासण्यासाठी  विविध प्रकारच्या चाचण्या होतात. या चाचण्या गटांमध्ये होतात. यासाठी आपणास आपल्यासारख्या ऑफीसर होऊ इच्छिणाऱ्या गटा बरोबर सराव करणे गरजेचे आहे.

मुलाखत ही एकूण पाच दिवस चालते. यात बऱ्याच प्रकारच्या टेस्ट चालतात या टेस्टस् ची सखोल  माहिती  आपण तयारी  SSBची या पुढील लेखात पाहू.


NDA ची तयारी - 11वी प्रवेश 

NDAच्या लेखी परिक्षेचे विषय व पेपर सोडवण्याची कौशल्ये या बद्दल आपण माहीती घेतली

NDA परिक्षेत गणिताला फार महत्त्व आहे. 300 मार्कांचा संपुर्ण स्वतंत्र पेपर आहे. संरक्षण दलात वायुसेना व नौसेना यात जाण्यासाठी गणित व शास्त्र या विषयांचा अभ्यास अनिवार्य आहे. NDA ची तयारी करतानाच 11वी 12 वी चा अभ्यास संपवणे  आवश्यक आहे. यासाठी शास्त्र शाखेची निवड ही फायद्याची राहील. गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र व इंग्रजी यांमुळे आपल्याला सर्व Officer entries चे पर्याय खुले राहतील तसेच NDA 11 वी यातील अभ्यास सारखा झाल्याने अभ्यासाचा ताण कमी राहील कॉमर्स व आर्टस् शाखांची निवड करुन NDA त जाता येईल पण या साईडसना फक्त ARMY हा एकमेव पर्याय खुला राहील व परिक्षेसाठी शास्त्र शाखा व गणित यांचा अभ्यास करावाच लागेल. यासाठी शास्त्र शाखेची निवड ही फायद्याची राहील.

सर्वसाधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याला लेखी परिक्षेला बसण्याची संधी तीन ते चार वेळा मिळते.   

      बारावीच्या परिक्षेनंतर NDAच्या तयारीसाठी कमी कालावधी मिळतो परिक्षेला बसण्याची संधी 

      कमी वेळा मिळते. यामुळे पहिल्या प्रयत्नात यश मिळाल्यास पुढच्या वेळेस पुन्हा परिक्षा   

            देण्याची संधी मिळवायची असेल तर दहावीनंतरच 1 मे पासून तयारी सुरू केलेली उत्तम.

            तेव्हा विद्यार्थी मित्रांनो 10 वी पास होणारच आहात, चांगले कॉलेज मिळेलच   

      आणि पसंतीचे किंवा सोईचे कॉलेज नाही मिळाले तरी बहिस्थ: विद्यार्थी, NIOS असे पर्याय खुले 

      आहेतच. मग आपले NDA चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी 10 वी नंतर निकालाची वाट पहात थांबू नका

      एप्रिलमध्ये छान गिर्यारोहणाचे किंवा  अन्य प्रकारचे कॅम्प करा ताजेतवाने व्हा व 1 मे पासून NDA च्या

अभ्यासाला सुरुवात करा.

पंथ है प्रशस्त शुर साहसी बढे चलो, वीर बनो , धीर  बनो,  ग्याने गंभीर बनो बिजलीके तीर बनो ,बढे चलो |
बढे चलो|


29 Mar 2024

चला कूच करुया एका प्रतिष्ठित करियरकडे

लष्करात अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्यांसाठी अनेक पर्यांयांपैकी एक उत्तम पर्याय म्हणजेच NDA नॅशनल डिफेन्स ॲकॅडेमी किंवा राष्ट्रीय रक्षा अकादमी केंद्रसरकारद्वारा संचालित या संस्थेत भारतीय लष्करी अधिकारी घडवले जातात. या संस्थेची स्थापना महाराष्ट्रात पुणे येथे करण्यात आली आहे.  येथे शारिरीक, मानसिक तसेच शैक्षणिक शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. जवाहरलाल नेहरु विद्यापिठाची BSC,BA किंवा BComची डिग्री विद्यार्थ्यांना प्राप्त होते. तीन वर्षांचा असा एकूण येथील प्रशिक्षण कालावधी आहे.


पुर्वतयारी:

सर्व साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्यास तो बारावीत असतानाच्या ऑगस्ट मध्ये प्रथम परीक्षेची संधी मिळते यात तो यशस्वी झाल्यास NDAत दाखल होऊ शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांस ११वी १२वी चा अभ्यास  १२वीत जाण्यापुर्वी संपवावा लागतो. या साठी १० वीच्या परीक्षेनंतरच जर त्याने तयारी सुरु केली तर त्यास यात यश मिळवणे सोपे जाते.

       गणित, इंग्रजी हे NDAच्या परिक्षेचे महत्ताचे विषय असल्याने या विषयात प्राविण्य मिळवण्यासाठी १०वी नंतरच्या मोठ्या सुट्टीचा वापर करावा. त्याच बरोबरच इतिहास, भूगोल या विषयांचे वाचन व अभ्यास करावा. याचा परिक्षे बरोबरच व्यत्त्किमत्व विकासासाठी त्यास उपयोग होईल व सुट्टीही मजेत जाईल तसेच या सुट्टीत एखादी परकीय भाषा शिकल्यास व व्यायामाची सवय जोपासल्यास त्याचा फायदा मिळेल.

 ११ वी प्रवेशाची तयारी :

११ वीत प्रवेश घेताना दोन मुद्यांचा विचार करावा

1) NDAपरीक्षा पास होण्यासाठी विषय निवडणे

2) NDAपरीक्षा पास न झाल्यास जो कोर्स निवडायचा असेल त्यानुसार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एयर फोर्स किंवा नेव्ही ऑप्शन्स्    निवडायचे आहेत. त्यांना शास्त्र शाखा अनिवार्य आहे. कला आणि वाणिज्य शाखा निवडल्यास आर्मी हा एकमेव पर्याय शिल्लक राहील.

शास्त्र शाखा निवडल्यास गणित, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र हे विषय असलेच पाहिजेत. उरलेल्या विषयांसाठी जीवशास्त्र किंवा भुगोल व एक परकीय भाषा असे विषय निवडावेत. कला शाखा निवडल्यास गणित, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र,इंग्रजी, एक परकीय भाषा व अन्य आपल्या आवडीप्रमाणे विषय निवडावेत. वाणिज्य शाखा निवडल्यास गणित, इंग्रजी, इकॉनॉमिक्स्, अकांऊटस् व आपल्या आवडीप्रमाणे अन्य विषय निवडावेत. श्स पद्धतीने विषय निवडल्यास लेखी  परीक्षेची तयारी व ११वी १२वी ची तयारी समान राहिल्याने आपणास NDA व ११वी १२वी साठी वेगळा वेगळा अभ्यास करावा लागणार नाही. त्यामूळे वेळही वाचेल व यश मिळवणे सोपे जाईल. शक्यतो वाणिज्य शाखा निवडू नये.

योग्य प्रवेश झाल्यानंतर आता तयारी लेखी परीक्षेची :

लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ११ वी १२वी चा अभ्यासक्रम १२वी च्या ऑगस्टपुर्वी संपवणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा पुढीलप्रमाणे असते.

१) लेखी परीक्षेत दोन पेपर असतात. पहिला-गणित 300 मार्कांचा-साधारणत: 11वी 12वी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित,दुसरा पेपर -सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल ॲबिलीटी टेस्ट 600 मार्कांचा- या पेपरचे एकूण तीन भाग पडतात पहिला भाग - इंग्रजी 200 मार्क,दुसरा भाग - शास्त्र 200 मार्कस्, तीसरा भाग - इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान व चालू घटना एकूण 200 मार्कस् प्रत्येक पेपर अडीच तासांचा असतो. प्रत्येक प्रश्नास चार पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्याय निवडायचा असतो. चुकीच्या उत्तरास निगेटीव्ह मार्किंग प्रमाणे गुण कमी केले जातात. गणिताच्या पेपरमध्ये 120 प्रश्न असतात. तर दुसऱ्या पेपरमध्ये 150 प्रश्न असतात. त्यामूळे कमी वेळामध्ये अधिका अधिक प्रश्न सोडवण्याचा सराव करावा लागतो. लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वप्रथम सर्व अभ्यासक्रमाची थेअरी उत्तम करावी व त्यानंतर कमी वेळेत प्रश्न सोडवण्यासाठी सराव करावा. प्रश्न सोडविण्याच्या युक्त्या तयार कराव्यात.

लेखी परिक्षेचे दोन्ही पेपर एकाच दिवशी असतात. पहिला पेपर गणिताचा 10 ते 12.30 व दूसरा पेपर 2 ते 4.30 या वेळात असतो. महाराष्ट्रात ही परिक्षा मुंबई व नागपूर येथील केंद्रांवर देता येते.

परिक्षेचे फॉर्मस् प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा पोस्ट ऑफीसमध्ये मिळतात. सर्व प्रमुख वर्तमान पत्रात जाहिरात येते. एम्प्लॉयमेंट न्यूज किंवा रोजगार समाचार पत्रात सविस्तर जाहिरात येते. जाहिरात आल्यापासून 1 महिन्याच्या मुदतीत फॉर्म भरुन पाठवावा लागतो. या सगळ्याचे वेळापत्रक www.upsc.gov.in या वेबसाईटवरती पहायला मिळेल.

लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पत्राद्वारे कळविण्यात येते तसेच मुलाखतीची  तारीख वेळ कळविली जाते. सर्वसाधारणपणे तीन महिन्यांनी वरील वेबसाईटवर निकाल पहाता येतो. तसेच मुलाखतीची तारीख व माहिती मिळवता येते.

प्रत्यक्ष फॉर्म भरण्यापासून ते अकादमीत दाखल होण्यापर्यंतचा असा एक वर्षाचा कार्यक्रम आहे. त्याचे ठळक मुद्दे पुढील प्रमाणे 


१)फॉर्म भरणे (१ महिना)

२)ही परिक्षा वर्षातून दोनदा होते त्यामुळे नोव्हेंबर व मार्च अश्या दोन्ही महिन्यात फॉर्म उपलब्ध होतात प्रत्यक्ष वेळापत्रक www.upsc.gov.in या वेबसाईटवर तपासावे.

३)लेखी  परिक्षा- फॉर्म भरणे संपल्यानंतर ५ महिन्यांनी एप्रिल व ऑगस्ट अनुक्रमे (तपशील पुढे पहा)

४)लेखी परिक्षेचा निकाल 3 महिन्यांनी जाहीर होतो त्यानंतर मुलाखतीसाठी  म्हणून पात्र उमेदवारांस बोलावले जाते. शेवटच्या मुलाखतीनंतर ३ महिन्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होते

५)साधारणपणे २७ डिसेंबर किंवा २७ जून अनुक्रमे विद्यार्थ्यी अकादमीत प्रवेश मिळवतात.


मुलाखत परीक्षा :

ही परिक्षा एकूण सात दिवसांची असते. त्याचे दोन भाग असतात. पहिल्या भागास चाळणी परीक्षा असे म्हणतात. यात उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यी मुलाखतीच्या दुसऱ्या भागात जातात व अनुर्त्तीण विद्यार्थ्यास परत पाठविले जाते. मुलाखत परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारच्या सायकॉलॉजी टेस्ट तसेच ग्राऊंड टेस्टस् होतात. मुलाखत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यास NDA साठी रेक्मेंड केले जाते. अश्या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करतात. व त्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची गुणवत्ता यादी तयार केली जाते. या यादी प्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. परीक्षेच्या कुठल्याही स्टेजला अनुत्तीर्ण झाल्यास परत प्रथम तयारी करावी लागते.


समज गैर समज:

या परीक्षेबाबत अनेक गैर समज आढळून येतात. जसे विद्यार्थ्यांची तब्येत अतिशय धडधाकट असणे तो कराटे चॅम्पियन असणे किंवा त्याचे कुणीतरी सैन्यदलात अधिकारी असणे किंवा सैनिक शाळेत असणे आवश्यक आहे; अशी चुकीची समजूत आहे. प्रत्यक्षात तो विद्यार्थ्यी केवळ प्रशिक्षणास सक्षम असणे व त्याने परीक्षेत गुणवत्ता यादीत येणे पुरेसे आहे. NDA त प्रवेशासाठी कोणत्याही राखीव जागा किंवा आरक्षण नाहीत. त्यामूळे अश्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.









ENQUIRE NOW